
हिंगोली, दिनांक १९ (जिमाका): राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू शेतशिवारात सोयाबीन पिकांची पाहणी केली. पाहणीनंतर शेतकरी शंकर दत्तराव कऱ्हाळे यांच्या शेताच्या बांधावर त्यांनी शेतकऱ्यांसोबत बेसन-भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा या साध्या जेवणाचा आस्वाद घेतला.

हिंगोली जिल्ह्यासह औंढा नागनाथ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री भरणे यांनी हिवरा जाटू येथे शेतातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. यावर विविध योजनांच्या माध्यमातून तसेच शासनाकडून लवकरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी ग्वाही मंत्री भरणे यांनी दिली.
यावेळी राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, गटविकास अधिकारी गोपाळ कल्हारे, तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद संघेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
००००

Leave a Reply